People
माझी काही रचनात्मकता...
माझ्या बद्दल...
मन सैर भैर झालेलं........
............जाणवतं...कागदाच्या कोप-यावर उगाच, कसलातरी विचार करायच्या मनस्थितीमुळे उगीचच
एक टिंब बालपेननं भिरवत राहतो................
............पेनाच्या गिरक्यागत एकेकवलय, उलगडत, गुंतत जातं ठरावीक विचार आकार घेत पहिली ओळ सुरू होते........................
सुकला रे वसंत सारा, सांग कुणा मारावी हाक?
अंधाराची नक्षी बावरी, फ़ुले प्रकाशाची तू टाक.
Pages
बळीराजा
भिंतीच्या उलगडल्या रेघा;लई दिस झाले,नाही मारला चुना पावसाचं आड्यातुन गळते पाणी;लई दिस झाले,नाही फ़ेरलं आडं आंगणातली चुरमडली तुळसी;झडले सारे पानं शेतातलं पीक सारं;गेलं करपून
स्मृतीच्या माळरानावर
तुझ्या स्मृतीच्या माळरानावर,माझी स्मृती फ़ुलु देत एकदातरी प्राजक्तासारखी।उमलु दे माझ्या स्वप्नातील कळ्या,भुंग्याचे एक 'रूप' होऊन ।
सांगून ठेवतो
आकाशात चमकणा-या रम्य चंद्रा,आज ढ्गाआड लपू नकोस,सुगंध शिंपणा-या फ़ुलावरच ओलं दंव टिपू नकोस,माझी प्रिया येणार आहे ती आल्यावर...
आदर्श विवाह : आजची आवश्यकता
हिंदू संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी विवाह सुध्दा एक मानव जीवनाचा संस्कार आहे. फ़ार जुन्या श्रीस्वेतकेतुच्या( सामाजिक कार्यकर्ता ज्याने विवाहाची पध्दती पहिल्यांदा सुरू केली. )पिढ्यानपिढ्या प्रचलित असलेल्या भारतीय संस्कृतीच्या धार्मिक अनुष्ठानाचा आणि कालान्तराने धर्म-विधीचे एक स्वरूप प्रकटलेल्या विवाहाबद्दलच्या पवित्र कल्पनाच आपण धुडकाऊन लावल्या आहेत.
प्रेमा तुझा रंग असा..
प्रिय...... प्रेमाचे दोन अश्रू. मी तुला सदर पत्र लिहीत आहे याच आश्चर्य वाटत असेल कदाचीत ! नाही? पण खरोखरच तुझ्या स्मृती आज वेदनेची ओल ...