Header Ads

गावचा वड

माह्या गावचा गा वड
होता जव्हा भर जवानीत
वड सायीत्रीच्या दिशी
त्याले बाया गा पुजत

माह्या गावच्या वडाची
साल किती गा पवित्र
ओ गा! बाया पुजे त्याल्रे
कुत्रे चाट्ते मात्र-

रातीच्या पायरी ज्याच्या खाली
गाण्याचा फ़ुटे पान्हा
तिथं गा दुपारच्या संजेले
एखादं पाखरू बी टेकेना

जिथं पाह्यलं होतं
त्या देवाच गा ठाणं
तिथच पाह्यणं आलं
भुताट्कीचं मशाणं

माह्या गावचा वड
झाला गा म्हातारा
जिथं ज्याले चाले पुजा
फ़िरे तिथं लोखंडी आरा

गावच्या वडावर वाजते ड्फ़
राह्यते बांगड्या किणकिणत
वड - सायीत्रीच्या पुजेले
आता बाया दुस-या वडाच्या शोधात-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

बळीराजा

भिंतीच्या उलगडल्या रेघा;लई दिस झाले,नाही मारला चुना पावसाचं आड्यातुन गळते पाणी;लई दिस झाले,नाही फ़ेरलं आडं आंगणातली चुरमडली तुळसी;झडले सारे पानं शेतातलं पीक सारं;गेलं करपून

स्मृतीच्या माळरानावर

तुझ्या स्मृतीच्या माळरानावर,माझी स्मृती फ़ुलु देत एकदातरी प्राजक्तासारखी।उमलु दे माझ्या स्वप्नातील कळ्या,भुंग्याचे एक 'रूप' होऊन ।

सांगून ठेवतो

आकाशात चमकणा-या रम्य चंद्रा,आज ढ्गाआड लपू नकोस,सुगंध शिंपणा-या फ़ुलावरच ओलं दंव टिपू नकोस,माझी प्रिया येणार आहे ती आल्यावर...

आदर्श विवाह : आजची आवश्यकता

हिंदू संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी विवाह सुध्दा एक मानव जीवनाचा संस्कार आहे. फ़ार जुन्या श्रीस्वेतकेतुच्या( सामाजिक कार्यकर्ता ज्याने विवाहाची पध्दती पहिल्यांदा सुरू केली. )पिढ्यानपिढ्या प्रचलित असलेल्या भारतीय संस्कृतीच्या धार्मिक अनुष्ठानाचा आणि कालान्तराने धर्म-विधीचे एक स्वरूप प्रकटलेल्या विवाहाबद्दलच्या पवित्र कल्पनाच आपण धुडकाऊन लावल्या आहेत.

प्रेमा तुझा रंग असा..

प्रिय...... प्रेमाचे दोन अश्रू. मी तुला सदर पत्र लिहीत आहे याच आश्चर्य वाटत असेल कदाचीत ! नाही? पण खरोखरच तुझ्या स्मृती आज वेदनेची ओल ...

Blogger द्वारे प्रायोजित.