Header Ads

प्रारब्ध

एक मातीची पणती
प्रज्वलित पर्णकुटीत
शक्तिभर-
पण आता
पणतीच्या जागी
प्रज्वलित सुवर्ण समई अन
प्रकाशित कांक्रीट्चा चौकोन--
दैवाचा हा कौल आहे
इथे कर्तुत्वाला मोल आहे
-पणती असेल सुवर्णाची वा मातीची
पण-प्रज्वलित वात तीच असते
दैवाला सुवर्णाच्या अस्तित्वाचे भान आहे
मातीच्या पणतीला वातेची जाण आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

बळीराजा

भिंतीच्या उलगडल्या रेघा;लई दिस झाले,नाही मारला चुना पावसाचं आड्यातुन गळते पाणी;लई दिस झाले,नाही फ़ेरलं आडं आंगणातली चुरमडली तुळसी;झडले सारे पानं शेतातलं पीक सारं;गेलं करपून

स्मृतीच्या माळरानावर

तुझ्या स्मृतीच्या माळरानावर,माझी स्मृती फ़ुलु देत एकदातरी प्राजक्तासारखी।उमलु दे माझ्या स्वप्नातील कळ्या,भुंग्याचे एक 'रूप' होऊन ।

सांगून ठेवतो

आकाशात चमकणा-या रम्य चंद्रा,आज ढ्गाआड लपू नकोस,सुगंध शिंपणा-या फ़ुलावरच ओलं दंव टिपू नकोस,माझी प्रिया येणार आहे ती आल्यावर...

आदर्श विवाह : आजची आवश्यकता

हिंदू संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी विवाह सुध्दा एक मानव जीवनाचा संस्कार आहे. फ़ार जुन्या श्रीस्वेतकेतुच्या( सामाजिक कार्यकर्ता ज्याने विवाहाची पध्दती पहिल्यांदा सुरू केली. )पिढ्यानपिढ्या प्रचलित असलेल्या भारतीय संस्कृतीच्या धार्मिक अनुष्ठानाचा आणि कालान्तराने धर्म-विधीचे एक स्वरूप प्रकटलेल्या विवाहाबद्दलच्या पवित्र कल्पनाच आपण धुडकाऊन लावल्या आहेत.

प्रेमा तुझा रंग असा..

प्रिय...... प्रेमाचे दोन अश्रू. मी तुला सदर पत्र लिहीत आहे याच आश्चर्य वाटत असेल कदाचीत ! नाही? पण खरोखरच तुझ्या स्मृती आज वेदनेची ओल ...

Blogger द्वारे प्रायोजित.